निवडक अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांची सैर..
भारता सरकारने आजही काही ठिकाणंही खास घोषित केल्यामूळे अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांच्या मार्फत आपण वन्यजीवांना याचि देहि याची डोळा पाहू शकतो.. खास वन्यप्रेमींना आकृष्ट करणारी काही ठिकाणं.
नागझिरा :
गोंदिया जिल्ह्यातील साकोली तालुक्यात हे अरण्य वसले आहे. १९६९ मध्ये मारूती चितमपल्ली यांच्यामुळे या अभयारण्याची निर्मिती झाली. १५३ चौरस किमी परिसरात वसलेल्या या अभयारण्यात प्राचीन काळी हत्तींचे वास्तव्य असल्याने याला नागझिरा असे नाव पडले. तळ्याभोवती वसलेल्या या जंगलात वनविश्राम गृह आहे. खास विद्यार्थ्यांसाठी टू टायर बेडस् असलेले युथ हॉस्टेलसुद्धा आहे. या जंगलात आढळणारा मुख्य वृक्ष म्हणजे साग. त्याचबरोबर धावडा, तीवस, एैना, जांभूळ, बिजा इत्यादी वृक्ष आढळतात. तळ्याच्या काठावर आणि टेकडीवर, तसेच जंगलामध्ये अनेक ठिकाणी वनखात्याने निरीक्षण मनोरे तयार केले आहेत. वाघ, बिबटे, रानकुत्री, अस्वले, नीलगाय, चितळ, सांबर, भेकर, कोल्हे असे विविध प्राणी आणि धनेरा, सर्पगरूड, सातभाई, स्वर्गीय नर्तक, वेडा राघू असे पक्षीही आढळतात.
पुढील पानावर पाहा ताडोबा राष्ट्रीय उद्यान
नागपूरपासून १५० कि.मी.वर चंद्रपूर आहे. याच जिल्ह्यात हे उद्यान येते. चंद्रपूरपासून येथे जाण्याकरता ४५ कि.मी. प्रवास करावा लागतो. उष्णकटीबंधीय शुष्क पानझडीचे जंगल या प्रकारात हे जंगल मोडते. यात मोह, बेगडा, अमलतारा, तेंद, बांबू, हिरडा इ. वृक्ष आहेत. अनेक सरपटणारे प्राणी, सरडे, विविध फुलपाखरे तसेच जलाशयातील मगर हे इथले खास आकर्षण आहे. इथल्या तळ्याकाठी निवासस्थाने असून, रात्री किंवा सकाळी तळ्याच्या काठावर बसून अनेक प्राणी-पक्षी न्याहाळता येतात.
पुढील पानावर पाहा पेंच राष्ट्रीय उद्यान