उन्हाळा सुरू झाला की अंगाची लाहीलाही होते, त्यामुळे कडक उन्हाळा लागण्यापूर्वी महाराष्ट्रातील काही थंड आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट देणे हा उत्तम पर्याय आहे. तसेच महाराष्ट्र हे वैविध्यपूर्ण राज्यांपैकी एक आहे. इथे तुम्हाला उंच डोंगररांगा, अथांग समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक गड-किल्ले अशा सर्व प्रकारच्या सौंदर्याचा अनुभव घेता येतो.
पाचगणी सातारा
निसर्गप्रेमींसाठी हे सदाबहार ठिकाण आहे. मार्च महिन्यात इथले हवामान अतिशय आल्हाददायक असते.
खास आकर्षण: स्ट्रॉबेरी फार्म्स (या काळात ताज्या स्ट्रॉबेरीचा आनंद घेता येतो), टेबल लँड, वेण्णा लेक आणि मॅप्रो गार्डन.
का जावे: उन्हाळ्यातील प्रचंड गर्दी टाळण्यासाठी मार्च हा सर्वोत्तम महिना आहे.
भंडारदरा अहमदनगर
शांती आणि निवांतपणा हवा असेल, तर भंडारदरा हा एक उत्तम पर्याय आहे. प्रवरा नदीच्या काठी वसलेले हे ठिकाण कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे.
खास आकर्षण: आर्थर लेक, विल्सन डॅम, आणि कळसूबाई शिखराचे दर्शन.
का जावे: येथील जलाशयामुळे हवेत गारवा असतो आणि रात्रीचे चांदणे पाहण्याचा अनुभव विलोभनीय असतो.
आंबोली सिंधुदुर्ग
महाराष्ट्राचे 'चेरापुंजी' म्हणून ओळखले जाणारे आंबोली हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे.
खास आकर्षण: आंबोली घाट, धबधबे आणि विविध प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती.
का जावे: कोकण आणि घाटमाथा यांचा संगम असल्याने येथील वातावरण मनाला उभारी देणारे असते.
चिखलदरा अमरावती
विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण. कॉफीच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण शांततेचा शोध घेणाऱ्यांसाठी उत्तम आहे.
खास आकर्षण: मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गाविलगड किल्ला आणि भीमकुंड.
का जावे: उन्हाळ्यात विदर्भात खूप उष्णता असते, पण चिखलदरा मात्र थंड असते.
तारकर्ली आणि मालवण सिंधुदुर्ग
जर तुम्हाला डोंगरदऱ्यांऐवजी समुद्रकिनारा आवडत असेल, तर उन्हाळा कडक होण्यापूर्वी कोकणचा समुद्रकिनारा गाठणे केव्हाही चांगले.
खास आकर्षण: स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला.
का जावे: एप्रिल-मे मध्ये समुद्रावर खूप उकाडा जाणवतो, त्यामुळे मार्चमध्ये समुद्राच्या पाण्याचा आणि सी-फूडचा आनंद घेणे सोयीचे ठरते.
'मिनी काश्मीर' तापोळा
महाबळेश्वरपासून जवळच असलेले हे ठिकाण कोयना धरणाच्या जलाशयाकाठी वसलेले आहे. याला महाराष्ट्राचे 'मिनी काश्मीर' म्हटले जाते.
विशेष: शांतता हवी असेल तर हे उत्तम ठिकाण आहे.
काय पाहाल: बोटिंग, जंगल ट्रेकिंग आणि निसर्गरम्य कॅम्पिंग.
ऐतिहासिक वारसा अजिंठा आणि वेरूळ लेणी छत्रपती संभाजीनगर
जागतिक वारसा स्थळ असलेल्या या लेण्यांमधील कोरीव काम पाहून तुम्ही थक्क व्हाल.
विशेष: इतिहास आणि कला प्रेमींसाठी हे जागतिक दर्जाचे ठिकाण आहे.
काय पाहाल: कैलास मंदिर (एकाच अखंड दगडातून कोरलेले), बुद्ध मूर्ती आणि प्राचीन चित्रे.