Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”

आजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”
पुण्यातील शनिवार वाडा खूप प्रसिद्ध आहे परंतू काय आपल्याला माहीत आहे की बाजीरावांच्या या महालात एका राजकुमारची आत्मा भटकतं असते. जवळपासच्या लोकांना त्यांच्या ओरडण्याची आणि रडण्याची आवाज ऐकू येते. शनिवारवाडा आपल्या या भुताटकी प्रकरणामुळे ही प्रसिद्ध आहे.
 
या महालाचा पाया 1730 साली शनिवारी ठेवण्यात आला असून त्या काळात 16, 110 रुपये लागत आली होती. या महालात एक हजाराहून अधिक लोक राहू शकत होते. 22 जानेवारी 1732 साली गृह प्रवेश करण्यात आले होते. नंतर यात एक काळे पान जुळले.
 
या महालात 30 ऑगस्ट 1773 ला रात्री 16 वर्षाचे नारायण राव, जे मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवा बनले होते, त्यांची कट रचून हत्या केली गेली. जेव्हा खाटीक किल्ल्यात शिरले तेव्हा नारायण रावांनी धोक्याची चाहूल लागली आणि ते आपल्या खोलीतून पळाले. नारायण राव पूर्ण महालात “काका मला वाचवा”..... “काका मला वाचवा” असे ओरडत होते. परंतू त्यांना वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. नारायण रावांच्या काकांनी त्यांच्या हत्येचे षडयंत्र रचले होते असे लोकं म्हणायचे.
नारायण राव यांची आत्मा आजही या किल्ल्यात भटकत असते आणि त्यांचे शेवटले शब्द काका मला वाचवा हेही लोकांना ऐकू येतात. अंधारात हे महाल अजूनच भीतिदायक वाटतं. महालाच्या भीतींवर रामायण आणि महाभारत काळातील दृश्य बनलेले आहेत. 
 
या महालाच्या पहिल्या मजलावर 17-18 शताब्दीच्या दरम्यानच्या काही वस्तू आणि मुरत्या ठेवलेल्या आहेत. या महालाचा एक मोठा भाग 1824 मध्ये जळाला होता.
 
शनिवार वाड्यात पाच दारं आहेत. जे दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा आणि गणेश दरवाजा नावाने ओळखले जातात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गण्याचे वडील HDFC चे मालक