Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Makar Sankranti Bornahan लहान मुलांचे बोरन्हाण का केले जाते? पद्धत आणि महत्व जाणून घ्या

Makar Sankranti Bornahan लहान मुलांचे बोरन्हाण का केले जाते?  पद्धत आणि महत्व जाणून घ्या
मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरन्हाण घातले जातात. मकर संक्रांतीच्या करीदिन हे बोरन्हाणासाठी योग्य आहे. पण काही जण हे रथ सप्तमी पर्यंत करतात. वयोगट 1 वर्षांच्या मुलानं पासून वयोगट 5 वर्षांचे मुलांचे बोरन्हाण केले जाते. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. संस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. 
 
बोरन्हाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात. पाटावर बसवून त्यांचे औक्षण करतात, व बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या, असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरुन ते टाकले जाते. त्यांनी बाळास अंघोळ घातली जाते. घरातील व जवळपासची लहानमुलेही या वेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात. ह्यालाच बोरन्हाण असे म्हणतात.
 
यामागील असे शास्त्र समजले जाते की या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असताना लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये हे लक्षात घेत या काळात मिळणारी फळे जसे बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा त्यांना खायला मिळाव्या म्हणून मजा करत हे लहान मुलांच्या डोक्यावरुन टाकलं जातं. ज्यानेकरुन खेळाच्या माध्यमातून मुले ती वेचून खातात. अशाने या वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनतं.
 
बोरन्हाण कां करायचे ह्याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नांवाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केले गेले त्या नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केले जाते. 
 
लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांचा वर करी राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहानं मुलांवर बोरन्हाण केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते. म्हणून यात बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण या मागे असावे. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Banyan Tree तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल तर वडाच्या झाडाचा हा छोटासा उपाय करा