Publish Date: Mon, 26 Feb 2024 (12:44 IST)
Updated Date: Mon, 26 Feb 2024 (12:53 IST)
महाराष्ट्रात आरक्षणाची आग थांबत नाहीये. हिंसाचाराची आग पुन्हा एकदा पेटली आहे. अंबड तालुक्यातील तीर्थपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आंदोलकांनी महाराष्ट्रा राज्य परिवहन मंडळची बस पेटवून दिली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. जालन्यातील बससेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
वृत्तसंस्थेनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने सांगितले की, 'महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुढील सूचना मिळेपर्यंत जालन्यात त्यांच्या बसेस थांबवल्या आहेत. मराठा आंदोलकांनी बस जाळल्याची तक्रार एमएसआरटीसीच्या अंबड आगार व्यवस्थापकाने स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.'
फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आलेले मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. 50 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा मराठ्यांना 10 टक्के आरक्षण देण्याचे उद्दिष्ट होते. त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेत कोटा विधेयक मंजूर होऊनही उपोषण मागे घेण्यास नकार दिला आणि पुन्हा उपोषणाला बसले.
मागण्या मान्य होऊनही आंदोलन सुरूच ठेवण्याची गरज काय, असा सवाल भाजप नेते अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.