कोलगेट पामोलिव्हच्या औरंगाबाद येथील कारखान्यात कर्मचाऱ्यांनी शनिवारी संप पुकारल्याने कारखान्याचे उत्पादन सलग दोन दिवस बंद राहिले.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी संपावर गेल्याने उत्पादन प्रभावित झाले असून, निलंबित कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कंपनी व्यवस्थापनाने या कर्मचाऱ्याला मागील आठवड्यात निलंबित केले होते. उत्पादनावर संपाचा प्रभाव पडू नये यासाठी कंपनीने पर्यायी व्यवस्था केल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.