राज्यात मुंबई आणि पुणे शहरासह अनेक ठिकाणी एटीएम गेल्या तीन-चार दिवसांपासून रिकामे आहेत. त्यामुळे ग्राहकांची पैसे काढण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. जिथे एटीएममध्ये रक्कम असल्याचं समजतं, तिथे पैसे काढण्यासाठी सर्वांची झुंबड उडतांना दिसत आहे. मात्र एटीएएम का रिकामे आहेत याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळे नोटाबंदीनंतर ओढावलेली स्थिती एका अर्थाने पुन्हा अनुभवायला मिळत आहे.