rashifal-2026

विमानतळाचे नियम रेल्वेला होणार लागू, तिकीट नाही ना मग प्रवेश नाही

Webdunia
देशातील  प्रमुख रेल्वे स्टेशनवर तेथे  प्रवेशासाठी तिकिट घेणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाणार असाल तर तुम्हाला तिकिट घेतल्याशिवाय आतमध्ये प्रवेश मिळणारच नाही. जसे विमान तळावर प्रवेश करण्यासाठी तिकिट आवश्यक आहे त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशनवर प्रवेशासाठी तिकिट अनिवार्य असणार आहे. 
 
सोबतच रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या भिंतीची उंची देखील वाढवण्यात येणार आहे. जेणेकरुन अनाधिकृत पद्धतीने कोणी आत प्रवेश करणार नाही. यात प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वेने लक्ष देण्याचा निर्णय घेतला असे स्पष्ट केले आहे.रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार रेल्वेतील प्रवाशी, स्टेशनवर असलेले प्रवासी यांची सुरक्षा मुख्य लक्ष आहे. याकरीता आरपीएफ कंमाडोंना विेशेष प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. 
 
कमांडो रेल्वे स्टेशनच्या प्रवेश द्वारावर सुरक्षा देणार आहेत. देशातील गुजरातच्या गांधीनगर, भोपाळच्या हबीबगंज येथील रेल्वे स्टेशनवर प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. सोबतच  दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई येथील रेल्वे स्टेशनवर देखील याला सुरुवात होणार आहे. सरकारकडून 114 कोटींची तरतूद हे साध्य करण्यासाठी सरकारने 114 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 
 
या अंतर्गत एक असे मशीन लावण्यात येईल की त्यानुसार तिकिट असलेले कर्मचारीच रेल्वे स्टेशनच्या आवारात प्रवेश करु शकतील. तसेच रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूना 3 हजार किलोमीटरची उंच भिंत उभारण्यात येईल. जेणेकरून कोणतीही व्यक्ती आतमध्ये येऊ शकणार नाही.आरपीएफचे महानिर्देशक अरुण कुमार यांनी प्रवाशांची सुरक्षा आमचे मुख्य ध्येय असल्याचे सांगितले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

कोल्हापूर विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक अशोक खरात प्रकरणावर मौन सोडले, कोणालाही सोडले जाणार नाही म्हणाले

कतारमध्ये हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले नेते बनले, पवन चामलिंग यांना मागे टाकले

पुढील लेख
Show comments