देशातील आयटी कंपन्यांसाठी असलेल्या आयकरातील सूट तीन वर्षांसाठी वाढवण्यात येणार असल्याचे संकेत केंद्रीय आयटी मंत्री ए राजा यांनी दिले आहेत.
2011 पर्यंत ही सवलत देशातील कंपन्यांना मिळू शकेल का, यासाठी सरकार विचार करत असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात देशातील आयटी कंपन्यांना एक वर्षासाठी आयकर सूट देण्याची घोषणा केली आहे.