केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात कृषी कल्याण अधिभाराची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी होत आहे. सेवा करात आजपासून अर्धा टक्का वाढ अमलात येणार आहे. सेवा करात आजपासून कृषी कल्याण अधिभाराची भर पडणार आहे. त्यामुळे सेवा कर आजपासून 15 टक्के झाला आहे.
त्यामुळे हॉटेलमध्ये खाणं, मोबाईलचं बील, रेल्वे, विमान, बससेवा, जाहिराती,ओला, उबरसारख्या टॅक्सी सेवा, रेल्वे आणि विमान तिकीट बांधकाम यासह अनेक सेवा आजपासून अर्ध्या टक्क्याने महाग होणार आहे.