Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'श्री'ची 'जान्हवी'ला सोडचिठ्ठी?

'श्री'ची 'जान्हवी'ला सोडचिठ्ठी?
पुणे , गुरूवार, 30 एप्रिल 2015 (10:51 IST)
'होणार सून मी या घरची' म्हणत केतकरांची सून झालेली जान्हवी अर्थात तेजश्री आणि शशांक लवकरच विभक्त होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. घटस्फोटासाठी शशांकने पुण्यातील कौटुंबिय न्यायालयात अर्ज केला असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याबाबची कागपत्रे हाती लागल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला आहे. 'होणार सून मी या घरची' या मालिकेत 'केमेस्ट्री' पाहून खर्‍या आयुष्यातही ते एकमेकांचे साथीदार असावेत, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती.
 
झालेही तसेच. शशांक आणि तेजश्री यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये खरोखरीच लग्नगाठ बांधली. यानंतर त्यांची जोडी 'आयडॉल' मधून पाहिली जाऊ लागली. मात्र, मालिकेतील प्रसंगांना शोभावे तसे फासे त्यांच्या खर्‍या आयुष्यात फिरले. विवाहाला एक वर्ष होण्यापूर्वीच त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापर्यत हे प्रकरण गेले.
 
दुर्देव म्हणजे त्या दोघांमध्ये कटुता निर्माण होणार प्रसंग मालिकेत दाखवले जात असतानाच ही जोडी पुन्हा एकत्र येणार अशी अपेक्षा प्रेक्षक बांधून आहेत. मात्र, मालिकेतील हे वळण त्यांच्या खर्‍या आयुष्यातही तसेच घेतल्याने प्रेक्षकांना आणि विशेष करुन या जोडीला 'आयडॉल'   मानणार्‍यांना धक्का बसेल हे नक्कीच. या बद्दल अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, मालिकेप्रमाणेच त्यांच्या खर्‍या   आयुष्यातही अचानक चांगले वळण लाभो आणि 'शेवट गोडा व्हा' अशीच त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi