मुंबई- रात्रीच्या आठ वाजता घरोघरी पाहिली जाणारी श्री-जान्हवी यांची गाजलेली मालिका ‘होणार सून मी ह्या घरची’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे वृत्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झी मराठी वाहिनीची ही प्रसिद्ध मालिका या महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारीतील पहिल्या आठवड्यात संपणार आहे. मात्र झी मराठीने यात काही तथ्य नसल्याचे म्हटले आहेत. शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांचा जोडीने घराघरात लोकांच्या मनात घर केले. लोकप्रियतेच्या बाबतीत अद्यापही ही मालिका शिखरावर असली तरी मध्यंतरीच्या काळात मालिकेला उतरती कळा लागली होती. जान्हवीचे
बाळंतपण, त्यांचे संवाद आणि पिंट्याच्या लग्नासहित काही गोष्टींमुळे सोशल मीडियावर भारी विनोद रंगले होते. सर्वीकडे मालिका आणि त्यातील पात्रांची खिल्ली उडवली जात होती.
15 जुलै 2013 पासून सुरू झालेल्या या या मालिकेचे काही दिवसापूर्वीच 750 भाग झाले आहेत.