Publish Date: Sat, 04 Feb 2017 (17:10 IST)
Updated Date: Sat, 04 Feb 2017 (17:16 IST)
सध्या ‘रांजण’ या आगामी मराठी सिनेमाची खूप चर्चा आहे. विद्याधर जोशी यांच्यासोबतच भाऊ कदम आणि गणेश भारतपुरेदेखील या सिनेमात दिसणार आहेत. प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असा विचार मांडणारा हा चित्रपट आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील ‘लागीर झालं रं’ या गाण्याचा सोशल मीडियात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यश आणि गौरी ही नवी आणि फ्रेश जोडी चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे.