Publish Date: Thu, 01 Dec 2016 (13:53 IST)
Updated Date: Thu, 01 Dec 2016 (13:59 IST)
लातूरचा नावलौकिक नाट्य आणि मराठी सिनेमामध्ये अजरामर करणारे श्रीराम गोजमगुंडे यांचे निधन झाले आहे. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत अनेक भूमिका केल्या आहेत.
त्यांचा जन्म २५/८/१९४६ झाला तर निधन ३०/११/२०१६ तोजी झाले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी खाजगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन ७० च्या दशकात नाटकाला अनेक पदके पटकावली.
१९७४ राजा शिवछत्रपती चित्रपटत अजरामर भूमिका त्यांनी केली आहे . तर ८० च्या दशकात लातुरला झटपट करु दे खटपट पहिला मराठी सिनेमा निर्मिती केला होता. सिनेनेनाट्य निर्माता दिग्दर्शक अभिनेता विविध कार्य त्यांनी केले आहे.
रसबहार या संस्थाच्या माध्यमातून अनेक नाटकाचे सादरीकरण त्यांनी केले. त्यांना नटवर्य छोटु पाटील पुरस्कार औरंगाबादला सन्मानित केले गेले आहे.त्यांनी अनेक मराठी चित्रपटत भूमिका केल्या आहेत. तर विभागीय व राज्यस्तरीय आठ सुवर्णपदक पटकावले आहेत. त्यांनी निर्मित केलेल्या दूरचित्रवाणीला बंदिनी तिसरा डोळा मालिका गाजल्या अआहेत. .गत काही दिवसापासून प्रदीर्घ आजाराने त्रस्त काल सायंकाळी खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे.