Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराट देशद्रोही, कारण विदेशात जाऊन लग्न केलं

विराट देशद्रोही, कारण विदेशात जाऊन लग्न केलं
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्ना विषयी आता मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचं अजब वक्तव्य समोर आलं आहे. मध्यप्रदेशातील गुणा येथील आमदार पन्नालाल शाक्य शाळेतील विद्यार्थ्यांना देशाशी एकनिष्ठ राहण्यावर व्याख्यान देत होते. त्यावेळी त्यांच्या निशाण्यावर विराट कोहली आला. परदेशात जाऊन लग्न केल्यामुळे त्यांनी कोहलीवर तोंडसुख घेतलं.
 
''देशासाठी खेळणाऱ्या विराट कोहलीने परदेशात जाऊन अनुष्का शर्मासोबत लग्न केलं. याला देशभक्ती नाही म्हणत. देशातला पैसा परदेशात खर्च करणं चुकीचं आहे. तुम्ही देशासाठी खेळता, पैसा कमावता आणि लग्न परदेशात जाऊन करता. याला देशभक्ती नाही, देशद्रोह म्हणातात'', असं पन्नालाल शाक्य म्हणाले. पन्नालाल शाक्य यांनी विराट आणि अनुष्काला पैशाचा सदुपयोग करण्याबाबत सल्लाही दिला. ''विराट आणि अनुष्काने लग्नासाठी जेवढा पैसा खर्च केला, त्यात किती गरीबांना रस्ता आणि वीज मिळाली असती. दोघांनीही लाखो चाहत्यांचा अपमान केला आहे'', असं ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सातही दिवस दुकाने सुरु ठेवा, मात्र कामगारांना आठवडी सुट्टी द्या