Publish Date: Tue, 12 May 2026 (10:08 IST)
Updated Date: Tue, 12 May 2026 (10:10 IST)
आयपीएल २०२६ चा अंतिम टप्पा आता सुरू झाला आहे. परिणामी, प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत मोठे बदल होत आहे. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यानेही गुणतालिकेत लक्षणीय बदल घडवला आहे.
आयपीएल २०२६ चा ५५ वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करत २१० धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्सने १९ व्या षटकात ३ गडी राखून सामना जिंकला. या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सने आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहे. इतकेच नाही, तर पंजाबला हरवून दिल्लीने चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांनाही मोठी मदत केली आहे. सध्या, ८ संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे.
या सामन्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सने १२ सामन्यांतून १० गुण मिळवून आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहे. मात्र, हा सामना गमावल्यानंतर पंजाब किंग्सचा मार्ग अधिकच कठीण झाला आहे. पंजाब गुणतालिकेत अजूनही चौथ्या स्थानावर कायम आहे.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा