Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टीम इंडियाच्या सिलेक्टर्सची हकालपट्टी

bcci
, शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (22:34 IST)
T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठे पाऊल उचलले आहे. बोर्डाने शुक्रवारी (18 नोव्हेंबर) चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीची हकालपट्टी केली. हकालपट्टी करण्यात आलेल्या निवडकर्त्यांमध्ये चेतन शर्मा (उत्तर विभाग), हरविंदर सिंग (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबाशीष मोहंती (पूर्व विभाग) यांचा समावेश आहे.
 
बीसीसीआयने आता मुख्य निवडकर्त्यासह एकूण पाच पदांसाठी अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) राष्ट्रीय निवडकर्ता (वरिष्ठ पुरुष संघ) पदासाठी अर्ज आमंत्रित करत आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या अर्जाचा विचार करण्यासाठी निकष पूर्ण केले पाहिजेत.
 
ज्या माजी क्रिकेटपटूंनी किमान 7 कसोटी सामने किंवा 30 प्रथम श्रेणी सामने किंवा 10 एकदिवसीय सामने आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत तेच निवडक पदासाठी अर्ज करू शकतील. तसेच किमान 5 वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. एवढेच नाही तर, एकूण 5 वर्षे कोणत्याही क्रिकेट समितीचा सदस्य राहिलेला कोणताही माजी क्रिकेटपटू पुरुष निवड समितीचा सदस्य होण्यास पात्र असणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) आहे.
 
चेतन जवळपास दोन वर्षे या पदावर राहिले
BCCI ची वरिष्ठ पुरुष निवड समिती 24 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर चेतन शर्माला प्रमुख बनवण्यात आले. वरिष्ठ राष्ट्रीय निवडकर्त्याचा कार्यकाळ हा सहसा चार वर्षांचा असतो आणि तो आणखी वाढवला जाऊ शकतो. चेतन शर्माने भारताकडून 23 कसोटी आणि 65 एकदिवसीय सामने खेळले आहेत. चेतन शर्माने कसोटीत 61, तर वनडेत 67 विकेट्स घेतल्या आहेत. चेतन शर्माने 1987 च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध संस्मरणीय हॅट्ट्रिक घेतली होती.
Edited by : Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुक्तच्या विशाखा काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठवण्याचे आवाहन