कानपूर- आधी माजी कर्णधार धोनी सामन्यादरम्यान खेळाडूंचा उत्साह, आत्मविश्वास वाढवित होता, मार्गदर्शन करीत होता. अगदी त्याचप्रमाणे आता विद्यमान कर्णधार विराट कोहलीसुद्धा खेळाडूंना प्रोत्साहन देतो. कोहली म्हणजे नवीन युवा खेळाडूंचा मार्गदर्शक आहे, असे हार्दिक पंड्या म्हणाला.
इंग्लंडविरूद्धची कसोटी व वनडे क्रिकेट मालिका जिंकल्यामुळे आमचे मनोधैर्य उंचावले आहे. ज्या जोशात आम्ही या मालिका जिंकल्या, तसेच टी-20 मालिकेतसुद्धा प्रदर्शन करू असा आत्मविश्वास हार्दिक पांड्याने व्यक्त केला आहे.