Publish Date: Tue, 06 Jun 2017 (13:19 IST)
Updated Date: Tue, 06 Jun 2017 (13:22 IST)
पाकिस्तानसोबतच्या विजयानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरावरुन कौतुकांचा वर्षाव होत आहे. पण पाकिस्तानचा पराभव माजी कर्णधार इम्रान खानला चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. इम्रान खान यांनी ट्विटरवर लिहिलंय की, खिलाडूवृत्तीची मला जाणीव आहे. त्यामुळे विजय आणि पराभव हा खेळाचा भाग असतो हे मला मान्य आहे. पण पाकिस्तानने भारताविरुद्ध संघर्ष न करता पराभव पत्करला. त्यामुळे हा पराभव वेदना देणारा असाच होता.
इम्रान यांनी पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डामधील कार्यपद्धतीवरही निशाणा साधला. पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे.