Publish Date: Mon, 22 Jul 2024 (11:45 IST)
Updated Date: Mon, 22 Jul 2024 (11:48 IST)
श्रीलंकेने आयोजित केलेल्या महिला आशिया चषक 2024 मध्ये आज भारताचा सामना UAEशी झाला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने यूएईचा 78 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता भारत 23 जुलै रोजी नेपाळविरुद्ध गटातील शेवटचा सामना खेळणार आहे. यूएईविरुद्धच्या विजयासह भारतीय संघ अ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याच्या खात्यात चार गुण आहेत आणि +3.386 चा निव्वळ रन रेट आहे.
डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून 201 धावा केल्या. प्रत्युत्तरात यूएईला 20 षटकांत 7 विकेट गमावून 123 धावा करता आल्या. भारताने हा सामना 78 धावांनी जिंकला.
202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईची सुरुवात काही खास झाली नाही
भारताकडून दीप्ती शर्माने दोन तर रेणुका, तनुजा, पूजा आणि राधा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
या सामन्यात शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 23 धावांची भागीदारी झाली.
हरमनप्रीत कौरने या सामन्यात 66 धावांची स्फोटक खेळी केली. तिने 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावला. यूएईसाठी कविशाने दोन तर समायरा आणि हीनाने प्रत्येकी एक विकेट घेतली.