Publish Date: Mon, 19 May 2025 (09:06 IST)
Updated Date: Mon, 19 May 2025 (09:09 IST)
IPL News : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २०० धावांचे लक्ष्य कोणत्याही नुकसानाशिवाय गाठले आणि इतिहास रचला.
१८ मे रोजी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एक हाय स्कोअरिंग सामना खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने गुजरातसमोर २०० धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांच्या जोडीने एकही विकेट न गमावता गाठले. त्यांनी पहिल्या विकेटसाठी २०५ धावांची नाबाद भागीदारी केली आणि अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या सुदर्शन आणि शुभमनची जोडी सर्वात यशस्वी भारतीय जोडी ठरली. या हंगामात त्यांनी मिळून आतापर्यंत ८३९ धावा केल्या आहे.
Edited By- Dhanashri Naik