Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टीम इंडियाने सामन्यासह मालिका जिंकली

टीम इंडियाने सामन्यासह मालिका जिंकली
, सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (10:10 IST)

टीम इंडियाने कानपूर वन डेत न्यूझीलंडवर सहा धावांनी थरारक विजय मिळवला. भारताने या विजयासह तीन वन डे सामन्यांची मालिकाही 2-1 ने जिंकली. टीम इंडियाचा वन डे सामन्यांमधला हा सलग सातवा मालिका विजय ठरला.

भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 338 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी त्या लक्ष्याचा आत्मविश्वासाने पाठलाग केला. पण जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्याने न्यूझीलंडला 50 षटकांत सात बाद 331 धावांत रोखलं.

भारताकडून जसप्रीत बुमराने 47 धावांत 3, तर यजुवेंद्र चहलने 47 धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं. दरम्यान संपूर्ण मालिकेत शानदार फॉर्मात असणारा भुवनेश्वर कुमार या सामन्यात जरा महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकात एक विकेट घेत 92 धावा दिल्या.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॉंग्रेस पाटीदार समाजाला आरक्षण कधी देणार - हार्दिक पटेल