Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टीम इंडियाकडून विडींजचा धुव्वा

टीम इंडियाकडून विडींजचा धुव्वा
, शनिवार, 15 जुलै 2023 (11:03 IST)
रविचंद्रन अश्विन आणि यशस्वी जैस्वाल. पदार्पण करणारा फलंदाज आणि सर्वात वरिष्ठ गोलंदाज या दोघांनी मिळून भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवून दिला. भारताने डॉमिनिका येथील पहिली कसोटी एक डाव आणि 141 धावांनी जिंकली.
 
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना जास्त वेळ क्रीजवर टिकू दिले नाही. विंडीजचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. भारताकडून रवी अश्विनने सर्वाधिक 5 बळी घेतले. तर तीन विकेट रवींद्र जडेजाच्या खात्यात गेल्या.
 
यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने विंडीजच्या गोलंदाजांना चांगलाच त्रास दिला. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी केली. म्हणजेच केवळ भारतीय सलामीवीर विंडीजच्या एकूण 79 धावांच्या पुढे गेले.
 
रोहित शर्माने 103 धावा केल्या. तर यशस्वीने 171 धावांची मोठी खेळी केली. माजी कर्णधार विराट कोहलीने 76 धावा केल्या. भारताने पहिला डाव 5 गडी गमावून 421 धावा करून घोषित केला. रवींद्र जडेजा 37 धावा करून नाबाद परतला. आणि त्यानंतर वेस्ट इंडिज त्यांच्या दुसऱ्या डावात अधिक वाईटरित्या अपयशी ठरला.
 
यावेळी त्याच्या फलंदाजीला केवळ 130 धावांची भर घालता आली. या डावातही अश्विन भारताचा स्टार होता. या डावात त्याने एकूण सात विकेट घेतल्या. म्हणजेच या सामन्यात त्याने एकूण 12 विकेट घेतल्या. या डावात जडेजाने दोन आणि सिराजला एक विकेट मिळाली. पदार्पणातील शतकासाठी यशस्वीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
 
सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला,
'देशासाठी केलेली प्रत्येक धाव खास असते. पण मी सांगू इच्छितो की आमची गोलंदाजी अप्रतिम होती. त्यांना केवळ 150 धावांवर बाद केल्याने आमच्यासाठी गेम सेट झाला. या विकेटवर फलंदाजी करणे थोडे कठीण जाईल, हे आम्हाला माहीत होते. पण आम्ही ठाम राहिलो, आम्ही चांगली गोलंदाजी केली. या खेळपट्टीवर, आम्हाला माहित होते की आम्ही फक्त एकदाच, दीर्घकाळ फलंदाजी करू इच्छितो. आणि 400 ओलांडल्यावर आम्ही पुन्हा चांगली गोलंदाजी केली.
 
रोहितनेही जैस्वालचे कौतुक केले. तो म्हणाला,
'त्याच्याकडे प्रतिभा आहे. आम्हाला त्याची माहिती होती. आपण मोठ्या मंचासाठी सज्ज असल्याचे त्याने गेल्या काही वर्षांत दाखवून दिले आहे. त्याने संयम दाखवला. त्याच्या स्वभावाचीही कसोटी लागली. कोणत्याही क्षणी तो घाबरला आहे असे वाटले नाही. मला फक्त त्याला आठवण करून द्यायची होती - तू इथे येण्यास पात्र आहेस. माझे काम फक्त त्याला सांगायचे होते की त्याने खूप मेहनत केली आहे आणि त्याला इथे फक्त मजा करायची आहे. 
 
मालिकेतील पुढील कसोटी 20 जुलैपासून खेळवली जाणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय आणि टी-20 सामनेही खेळवले जातील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाची चाहूल लागताच ACच्या दरात मोठी घसरण, सेलमध्ये बरेच ऑफर्स