Publish Date: Thu, 03 Aug 2017 (11:34 IST)
Updated Date: Thu, 03 Aug 2017 (11:36 IST)
कर्णधार विराट कोहलीने कोलंबो कसोटी जिंकली तर तो असा भारतीय कर्णधार बनेल ज्याने श्रीलंकेच्या जमिनीवर लगातार दोन वेळा सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला असेल. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने वर्ष 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 2-1ने कसोटी मालिका जिंकली होती. यापूर्वी 1 993 मध्ये भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्धीनच्या नेतृत्वात भारतीय संघाने श्रीलंकेला मात दिली होती. तेव्हा 23 वर्षानंतर श्रीलंकेच्या जमिनीवर भारतीय संघाला दुसर्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे.