Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराट कोहली खेळणार नाही!

विराट कोहली खेळणार नाही!
धर्मशाला- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या धर्मशालाच्या चौथ्या कसोटीत खेळण्याविषयी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबईचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरला धर्मशालातल्या भारतीय संघात सामील होण्याचा तातडीचा संदेश बीसीसीआयने दिला आहे.
 
रांची कसोटीच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना विराटचा उजवा खांदा दुखावला होता. भारतीय कर्णधाराने ती दुखापत बाळगूनच रांची कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी केली. दुसर्‍या डावात त्याने क्षेत्ररक्षणही केले. पण विराटने धर्मशालामध्ये टीम इंडियाच्या नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करणे कटाक्षाने टाळले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बेकायदा भारतीयांची यादी अमेरिकेने सोपविली