Publish Date: Thu, 07 Aug 2025 (08:45 IST)
Updated Date: Thu, 07 Aug 2025 (08:46 IST)
Rabindranath Tagore death anniversary रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 साली झाला होता. यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते. रवींद्रनाथ टागोर एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते.
ते त्याच्या आई वडिलांचे 13 वे अपत्य होते. लहानपणापासूनच त्यांना रबी असे संबोधले जात असे. कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या 8 व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत.
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20 व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेलविजेते होते.
आपल्या आयुष्यात त्यांनी एक हजार कविता, आठ कादंबर्या, आठ कथा संग्रह आणि विविध विषयांवर अनेक लेख लिहिले. एवढेच नव्हे तर रवींद्रनाथ टागोर हे संगीतप्रेमी होते आणि त्यांनी त्यांच्या जीवनात 2000 पेक्षा जास्त गाणी रचली. त्यांनी लिहिलेली दोन गाणी म्हणजे आज भारत आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत.
आयुष्याच्या 51 वर्षांपर्यंत त्यांच्या सर्व कर्तृत्त्वे आणि यश फक्त कोलकता आणि आसपासच्या क्षेत्रात मर्यादित राहिले. वयाच्या 51 व्या वर्षी ते आपल्या मुलासह इंग्लंडला जात होते. भारत व इंग्लंडला समुद्री मार्गाने जाताना त्यांनी गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रहाचे इंग्रजी भाषांतर करण्यास सुरवात केली. गीतांजली अनुवाद करण्यामागे त्यांचा कोणताचं हेतू नव्हता, फक्त प्रवासात वेळ घालविण्यासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी गीतांजलीचे भाषांतर करण्यास सुरवात केली. त्याने एका नोटबुकमध्ये हाताने गीतांजलीचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले.
लंडनमध्ये जहाजातून उतरताना त्याचा मुलगा नोटबुक ठेवलेला सूटकेस विसरला. ही ऐतिहासिक कृती सुटकेसमध्ये बंद राहण्यासाठी नव्हती. ज्याला तो सूटकेस मिळाला त्या व्यक्तीने दुसर्याच दिवशी रवींद्रनाथ टागोरांकडे ती सुटकेस दिली.
लंडनमधील टागोरचा इंग्रज मित्र असलेल्या चित्रकार रोथेन्स्टाईन यांना हे समजले की गीतांजलीचे भाषांतर रवींद्रनाथ टागोर यांनीच केले होते आणि त्यांनी ते वाचण्याची इच्छा व्यक्त केली. गीतांजली वाचल्यानंतर रोथेन्स्टाईन मुग्ध झाले आणि त्यांनी आपल्या मित्र डब्ल्यू.बी. यांनी गीतांजलीबद्दल सांगितले आणि वाचण्यासाठी नोटबुक दिली.
त्या नंतर जे घडले ते इतिहास आहे. येट्सने स्वत: गीतांजलीच्या इंग्रजीच्या मूळ आवृत्तीची प्रस्तावना लिहिले. सप्टेंबर 1912 मध्ये भारत सोसायटीच्या सहकार्याने गीतांजलीच्या इंग्रजी भाषेच्या काही मर्यादित प्रती प्रकाशित झाल्या.
लंडनच्या साहित्यिक वर्तुळात या पुस्तकाचे चांगले कौतुक झाले. लवकरच, गीतांजलीच्या शब्दाच्या नादांनी संपूर्ण जगाला सम्मोहित केले. पाश्चात्य जगाने प्रथमच भारतीय मनीषाची झलक पाहिली. गीतांजली प्रकाशित झाल्यानंतर एका वर्षानंतर रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.
टागोर हे केवळ एक महान रचनाकारच नव्हते तर पूर्व आणि पश्चिम जगाच्या दरम्यान पुल म्हणून काम करणारे ते पहिले व्यक्ती देखील होते. टागोर हे केवळ भारताचेच नाही तर जगभरातील साहित्य, कला आणि संगीत यांचे एक महान प्रकाश स्तंभ आहे, जे सर्वकाळ तेजस्वी राहतील.
webdunia
Publish Date: Thu, 07 Aug 2025 (08:45 IST)
Updated Date: Thu, 07 Aug 2025 (08:46 IST)