Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येळकोट येळकोट जय मल्हार

येळकोट येळकोट जय मल्हार
मार्गशीर्ष महिन्यात येणारे हे नवरात्र देवीच्या नवरात्रासारखेच असते. श्रीमहादेवाच्या मल्हारी मार्तंड हा एक अवतार होय. 
 
पुण्याजवळ असलेले जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे. 
कृतयुगात मणी व मल्ल या राक्षसांना ब्रह्म देवाने, ``तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही'' हा वर दिला त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली. 
 
भगवान शंकर त्यांचे म्हणणे ऐकून संतप्त झाले. त्यांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपल्या ७ कोटी (येळकोट) सैन्य घेऊन व कार्तिकेयासह ते मणि मल्ल राक्षसांवर चालून गेले. दोन्ही पक्षात प्रचंड युध्द होऊन अखेर मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाला त्याची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. मणी राक्षसाने शरण येऊन ``माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे'' अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले. 
 
नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला तेव्हा त्याचे शरण जाऊन ``तुमच्या नांवाआधी माझे नांव जोडले जावे अशी मागणी केली.'' तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी (मल्ल+अरी) मार्तंड असे म्हणण्यात येते. 
 
हा विशेषत: धनगराचा देव मानला जातो. अतिशय जागृत देव आहे. मुख्य भंडारा म्हणून हळद उधळली जाते; ज्वारीचा रोडगा व भरीत हा त्यांचा प्रसाद असतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चाणक्य नीती: सहा गोष्टी, आपल्या माहीत असाव्या...