ब्रह्मांडामध्ये अगणित तारेतारका, ग्रह, उपग्रह आहेत. दूरून पाहिल्यावर तेथे ताऱ्यांचे अनेक समूह दिसतात. या समूहांतून विविध आकृत्या तयार होतात. ताऱ्यांच्या या समूहालाच नक्षत्र म्हणतात. आकाशमंडळामध्ये २७ समूह आहेत, ज्यांना आपण २७ नक्षत्रे म्हणतो. या २७ नक्षत्रांना १२ भागांमध्ये विभाजित केलं गेलं आहे. त्या १२ भागांना आपण राशी म्हणतो. राशीचक्र म्हणजे नक्षत्रांचे वर्तुळ आहे ज्याच्या माध्यमातून सगळे ग्रह आकाशमंडळात गतिशील राहतात. नवग्रहांसोबत अनेक ज्ञात अज्ञात ग्रह आकाशात फिरत असतात. प्रत्येक ग्रह सतत कोणत्या ना कोणत्या राशीमध्ये असतो. भारतीय ज्योतीषशास्त्रामध्ये राशी ठरवण्यासाठी ३६० डिग्रीचा एक पथ मानला गेला आहे. ३६० डिग्रीला २७ भागांमध्ये विभागले जाते, म्हणजे प्रत्येक नक्षत्र १३ डिग्रीपेक्षा थोडे जास्त असते. याचप्रकारे ३६० डिग्रीला जर १२ने विभागले तर प्रत्येक राशी ३० डिग्रीची होते.