Publish Date: Wed, 25 May 2022 (23:18 IST)
Updated Date: Wed, 25 May 2022 (23:20 IST)
काही लोकांच्या हातात 6 बोटे असतात हे तुमच्या लक्षात आलेच असेल. हे सहावे बोट अंगठ्याच्या बाजूला किंवा करंगळीच्या बाजूला असते. काही लोकांच्या पायाला 6 बोटे देखील असतात. ज्योतिष आणि समुद्र शास्त्रानुसार ज्या लोकांच्या हाताला किंवा पायाला 6 बोटे असतात, ते भाग्यवान असतात.
ज्योतिषी सांगतात की 6 बोटे असलेले लोक ज्या व्यक्तीसोबत राहतात त्यांच्यासाठी भाग्यवान असतात. याशिवाय जर्मनीतील फ्रीबर्ग युनिव्हर्सिटी आणि इम्पिरियल कॉलेजमध्ये झालेल्या संशोधनात असे समोर आले आहे की ज्या लोकांची 6 बोटे आहेत ते कामाच्या बाबतीत पाच बोटे असलेल्या लोकांपेक्षा चांगले आहेत. ज्यांना भगवंताकडून 6 बोटांचे वरदान मिळाले आहे, ते मनाने अत्यंत कुशाग्र मानले जातात. 6 बोटांच्या लोकांची एक खासियत आहे की असे लोक प्रत्येक गोष्टीत संतुलन राखतात.
ज्योतिष आणि समुद्रशास्त्र काय सांगतं
ज्या लोकांच्या हाताच्या किंवा पायाच्या करंगळीजवळ अतिरिक्त बोट असते, त्यांच्यावर बुध पर्वताचा प्रभाव जास्त असतो. दुसरीकडे, ज्या लोकांच्या अंगठ्याजवळ अतिरिक्त बोट असते त्यांच्यावर अधिक प्रभाव पडतो.
बुध ग्रहाच्या प्रभावामुळे असे लोक कुशाग्र बुद्धीचे असतात. कुशाग्र मनामुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. या लोकांची काम करण्याची क्षमता इतर लोकांपेक्षा चांगली असते.
शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक खूप कलाप्रिय आणि शौकीन असतात. नवनवीन ठिकाणी फिरायला त्यांना खूप आवडतं. अशा व्यक्ती खूप मेहनत आणि प्रामाणिकपणाने पैसा कमावतात आणि हा पैसा राजेशाही जीवन जगण्यात खर्च करतात.
हस्तरेषा शास्त्रानुसार देखील 6 बोटे असलेले लोक भाग्यवान असतात. ते इतरांच्या कामातील उणीवा शोधून काढतात, त्यामुळे या लोकांना चांगले समीक्षकही म्हणतात. मात्र, काही वेळा चुका झाल्यामुळे त्यांचे लोकांशी असलेले नातेही बिघडते.