काही जणांना दम लागणे, कमजोरी वाटणे, थकवा जाणवणे अशा विविध समस्या असतात. या सर्व समस्या शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे होत असते. ही कमतरता कशी भरून काढता येईल त्याच्यावर आधारित काही टिप्स..
* एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस नियमित प्यावा.
* सफरचंदाच्या ज्यूसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावे. या मिश्रणात लोह तत्त्व जास्त असते.
* २ चमचे तीळ २ तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. पाणी गाळून तिळाची पेस्ट करून घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातून दोन वेळेस हे
मिश्रण खावे. त्यामुळेही रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.
* शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा.
* दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करा. सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा.
* चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करा.
* दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप समान मात्रामध्ये घेऊन चहा तयार करून घ्या.
* शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी अंकुरित धान्याचे सेवन करावे.
* मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे, यामुळेही हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
* सोयाबीन आयर्न आणि व्हिटॅमिनयुक्त असते. त्याचे सेवन केल्यास तो फॅटसह जास्त प्रमाणात आयर्न मिळवण्यास मदत करतो.
* नियमित बीटचे सेवन केल्यास रक्त वाढण्यास मदत होते.
* टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि लायकोपिनचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे शरीराला खूप मदत मिळते.
अशा सर्व घरगुती टिप्सचा वापर केल्यास तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल व तुम्हाला निरोगी राहण्यास मदत मिळेल.