Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पावसाळ्यात गरम पाणी प्यायल्यास काय फायदा होईल?

warm water
सतत गरम किंवा कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र आपल्याला सतत गरम पाणी प्यायचे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करा-
 
पावसाळ्याच्या दिवसात व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो. अशात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. या दिवसात सर्दी-पडसेच्या समस्या वारंवार पाहायला मिळतात. अशा स्थितीत दिवसातून तीन ने चार वेळा कोमट पाणी प्यायल्यास सर्दी-खोकलाचा त्रास दूर होईल.
 
गरम पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया वाढते. रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.
 
पावसाळ्याच्या दिवसात पोटाचा त्रास होतो. त्यामुळे बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि गॅस तयार होऊ लागतो. या हवामानात रोज कोमट पाणी प्यायल्यास काही दिवसातच ते बरे होऊ शकते.
 
कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण लघवीतून बाहेर पडण्यास मदत होते.
 
रोज गरम पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
 
कोमट पाणी तुमचा थकवा दूर करेल. जास्त थकवा येत असेल तर कोमट पाणी घ्या. 
 
दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. चेहऱ्यावर पिंपल्स देखील बाहेर येणार नाहीत.
 
गरम पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. यामुळे शरीरातील चरबी कमी होते.

गरम पाणी प्यायल्याने टॉक्सिन क्लीन होतात. हे शरीराला डिटॉक्सिफाय करून शरीर स्वच्छ करते.
 
घशात दुखत असेल तर कोमट पाण्याचे सेवन केल्याने खूप फायदा होतो.
 
पोट फुगीची समस्या असेल तर गरम पाणी प्यायल्याने खूप आराम मिळतो.
 
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी गरम पाणी खूप फायदेशीर आहे.
 
कोमट पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्याच्या समस्येपासून सुटका मिळते.
 
गरम पाण्याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रिया मजबूत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हत्ती बद्दल रोचक माहिती Information About Elephant