Publish Date: Sat, 08 Jun 2019 (00:30 IST)
Updated Date: Fri, 31 May 2019 (15:33 IST)
सध्या खिरनी बाजारात मिळू लागली आहे. निंबोळीच्या आकाराचे पिवळे फळ खिरनी अपभ्रंश नाव आहे, वास्तविक नाव क्षिरणी आहे, जे क्षीर(दूध)ने बनले आहे. याच्या फळात हलकं दूध निघत. याला आयुर्वेदात राजफळ यासाठी म्हणतात कारण महाराजांनी याचे सेवन केले होते.
शरीराला याचा काय फायदा होतो?
या फळामुळे शरीराला शीतलता येते. सप्तधातूचे काम करणारे हे फळ टीबी आणि गॅसचा नाश करतो. तसेच वारंवार लागणारी तहान देखील याने दूर होते.
हे फळ अॅसिडिटी दूर करतो म्हणून रक्त पित्तामध्ये देखील फायदेशीर आहे. जे लोक अत्यंत दुर्बळ असतात त्यांच्यासाठी चरबी वाढवण्याचे काम करतो
या फळात कॅल्शियम, फॉस्फोरस, आयरन देखील आहे. काही व्हिटॅमिन जसे ए. बी. आणि सी देखील यात आढळत. जर याच्या पिकलेल्या फळांना वाळवलंतर हे ड्रायफूटचे उत्तम विकल्प आहे. थंड असले तरी हे फळ शरीरात कफ होऊ देत नाही.