Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पावसाळी तापाचे कारण, लक्षण आणि महत्वाची खबरदारी जाणून घ्या

Learn
पावसाळा हा आल्हाददायक आणि आनंददायी हंगाम आहे.तरी या हंगामात संसर्ग झपाट्याने वाढतो.या हंगामात सर्दी-पडसं,खोकला सर्वात जास्त पसरतो.या पावसाळी तापापासून कसा टाळता येईल जाणून घेऊ या.
पावसाळी आजारापासून वाचण्यासाठी सर्वप्रथम हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे की हा आजार कोणत्या कारणामुळे होतो.
 

1 ठिकठिकाणी पाणी साचून त्यात डास वाढणे,जे डेंग्यू आणि मलेरिया पसरवतात.
 

2 विषारी कीटक,जंत,माश्या,डासांमुळे अन्नआणि पाणी संसर्गजन्य होणे.
 

3  वायू प्रदूषणाने संक्रमणाचा प्रसार.
 
 
4 पित्त प्रदूषित होणे,कारण पित्तामुळे होणाऱ्या आजारांमध्ये ताप प्रमुख आहे.
 

5 उन्हात चालणे आणि पावसात भिजणे.
 

आता या तापाची लक्षणे जाणून घेऊ या 
 

1 डोक्यात आणि शरीरात वेदना होणे.
 

2 लघवीचा रंग लाल होणे.
 

3 अस्वस्थता जाणवणे.
 

4 तहान जास्त प्रमाणात लागणे.
 

5 तोंडाची चव कडू होणे,मळमळणे,
 

6  संधिवातामुळे स्नायूंमध्ये वेदना होणे.
 
 

ताप असल्यास या खबरदारी घ्या - 
 
 

1 ताप असल्यास रुग्णाला मोकळ्या हवादार खोलीत झोपवावे.शक्य तितका  आराम करू द्या.
 

2 ताप असल्यास सकस आणि हलकं जेवण घ्या.
 

3 श्रम करू देऊ नका.
 

4 दूध,चहा,मोसंबीचा रस घेऊ शकता.तेलकट आणि गरिष्ठ मसालेयुक्त अन्न घेणं टाळा.
 

5 हे सर्व लक्षणे आढळल्यास त्वरितच डॉक्टरांना दाखवावे किंवा घरगुती आयुर्वेदिक उपचार करा.
 

6 पाणी उकळवून आणि कोमट करूनच प्या.
 

7 हंगामात बदल होण्याच्या वेळी योग्य आहार घेणे.
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निपाह व्हायरस संसर्गाची लक्षणं काय? हा व्हायरस कसा पसरतो?