Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लवंगाच्या वापर सावधगिरीने करा अन्यथा नुकसान होऊ शकते.

लवंगाच्या वापर सावधगिरीने करा अन्यथा नुकसान होऊ शकते.
, बुधवार, 12 मे 2021 (21:54 IST)
भारतीय पाककृतीमध्ये लवंगाला एक विशेष स्थान आहे. त्याचा उपयोग केल्याने चवीसह त्याचे काही महत्त्वाचे गुण देखील अन्नात जोडले जातात. याचा वापर तेल आणि अँटिसेप्टिक च्या रूपात केले जाते. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लवंगामध्ये बरेच गुणधर्म आहेत.
लवंगाची  विशेष चव त्यातील युजॅनॉलमुळे असते .या घटकामुळे त्यामध्ये एक विशेष प्रकारचा वास तयार होतो. जरी सर्व हवामानात लवंग सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर असले तरी हिवाळ्याच्या हंगामात त्याचे  विशेष उपयोग आहे, कारण त्याचा प्रभाव खूप गरम आहे. लवंग तेलाची प्रकृती  खूप उष्ण आहे आणि या कारणासाठी ते अत्यंत सावधगिरीने वापरावे. जेव्हा आपण आपल्या त्वचेवर हे लावता तेव्हा काहीही मिसळल्याशिवाय थेट लावू  नका.
 
1. लवंगाच्या वापरामुळे दातदुखीपासून आराम मिळतो आणि हेच कारण आहे की लवंग विशेषत: 99 टक्के टूथपेस्टच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत.
 
२ खोकला असल्यास आणि श्वासाच्या वास येत असल्यास लवंगा खूप फायदेशीर आहे. लवंगाच्या नियमित वापर केल्याने या समस्येपासून मुक्तता मिळते. आपण लवंग जेवण्यात किंवा शोप सह खाऊ शकता. 
 
3 सामान्य सर्दी लवंगाने बरी केली जाऊ शकते. दिवसातून 2 ते 3 वेळा मधात  लवंगा च्या तेलाचे 10 थेंब मिसळून वापरल्याने   सर्दीवर बरी करू शकता.
 
 
4. मेंदूचा ताण कमी करण्याचे  गुणधर्म लवंगामध्ये आहे. तुळस, पेपरमिंट आणि वेलचीसह लवंगा वापरुन आपण सुगंधित चहा बनवू शकता आणि आपण इच्छित असल्यास, मध सह वापरुन आपण तणावातून मुक्त होऊ शकता.
 
इतर कोणत्याही तेलापेक्षा लवंग तेलामध्ये सर्वाधिक अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. निरोगी त्वचा आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी अँटीऑक्सिडेंट खूप प्रभावी आहेत. लवंग तेलात पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारख्या खनिज पदार्थ जास्त प्रमाणात असतात.
 
लवंग आरोग्यवर्धक आहे, तर त्याचे काही तोटे देखील आहेत. चला, त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या .
 
जास्त प्रमाणात सेवन केल्याने आतड्यांना  नुकसान होऊ शकत.
 
लवंगाचे अति प्रमाणात सेवन केल्याने शरीरात जळजळ देखील होऊ शकते
 
 शरीरातील उष्णता वाढल्यावर मुरुमांशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकते.
 
जास्त प्रमाणात सेवन केल्याने एलर्जीची भीती देखील असते.
 
रक्त पातळ देखील होऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरातील या गोष्टी रोग प्रतिकारक शक्ती सुधारतात