Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

म्हणूनच वेळीच सावरावं, एकमेकांना

mother son story
, बुधवार, 6 एप्रिल 2022 (10:05 IST)
जाणीव होता गोष्टींची आंत काहीतरी नक्की होतं,
याचाच अर्थ असा ही, ते संवेदनशील असतं,
पण हळूहळू जेंव्हा जाणिवा बोथट होऊ लागतात,
मनाची कोमलता, लोकं हरवून मात्र बसतात,
तरीही चालत राहतो प्रवास कसाबसा,
मात्र अजिबात नसतोच तो मुळी हवाहवासा,
अतिरेक झाला की तूटत हे असं नातं पटकन,
कारण मुखवटे धरूनच वावरत असतात दोघे जण,
एकच क्षण पुरेसा असतो, अविवेकाचा,
संपून जातो प्रवास, त्यांचा आजपर्यंत चा,
म्हणून च वेळीच सावरावं, एकमेकांना,
द्यावा वेळ, घ्यावं मत द्यावी ऊब परस्परांना!!
...अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सेल्फींना 'Bye-Bye' म्हणायची वेळ आली आहे का? धक्कादायक बाब आलीआहे अभ्यासात समोर