येणार असेल मरण तर येऊ द्यावं, जमलसं तर लाडानं थोडं जवळ घ्यावं, अस म्हणत या शतदा प्रेम करणारे कविवर्य मंगेश पाडगावर (८६) यांचे निधन झाले.
सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. तसेच त्यांना महाराष्ट्र भूषण, 2013 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.