यावेळी पूजेसाठी भाविकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी जमलेली असते. भाविक अतिशय श्रद्धेने महावीरांची आराधनी करत असतात. सायंकाळी पूर्ण मंदिराला दिव्यांची रोषणाई केली जाते. मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या दुकानात पूजेसाठी लागणारी सर्व सामग्री उपलब्ध आहे. पर्वकाळात भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्याने त्यांची गरज भागविण्यासाठी अनेक तात्पुरती दुकानेही असतात. राजस्थानी हस्तकलाही यावेळी पहायला मिळते.
कधी जावे- या मंदिराचे दर्शन वर्षभरात केव्हाही घेऊ शकता. पण दर्शनाचा खरा आनंद मार्च ते एप्रिल महिन्यात होणाऱ्या पर्वावेळी घेता येतो.
कसे जावे- दिल्ली - मुंबई ब्रॉडगेज लाईनवर श्री महावीरजी रेल्वे स्टेशनहून चंदनगाव साडेसहा किलोमीटरवर आहे. हे स्थळ हिंदौनपासून अठरा, करौलीपासून २९ आणि जयपूरपासून १७६ किलोमीटरवर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी बस आणि टांग्याचीही व्यवस्था आहे.