Article Marathi Religious Articles %e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be 108020900014_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धारची भोजशाळा

धारची भोजशाळा

प्रेमविजय पाटील

WDWD
मध्य प्रदेशातील धारच्या ऐतिहासिक भोजशाळेत दरवर्षी वसंत पंचमीला सरस्वती देवीच्या उपासकांची जत्रा भरते. या ठिकाणी सरस्वती मातेची या दिवशी पूजा-अर्चा केली जाते. येथे यज्ञवेदीत पडणारी आहुती आणि अन्य अनुष्ठाने पूर्वीच्या वैभवाची आठवण करून देतात. या वर्षी 11 फेबुवारी 2008 ला वसंत पंचमी असून उत्साहित, आनंदी वातावरणात साजरी केली जाणार आहे.

राजा भोज हे सरस्वती देवीचे उपासक होते. त्यांच्या काळी सरस्वती देवीच्या साधनेला विशेष महत्त्व होते. त्या काळात सामान्य लोकही संस्कृतचे विद्वान असायचे. त्यामुळे धार, संस्कृत आणि संस्कृती यांचे केंद्रबिंदू होते. राजा भोज, सरस्वतीच्या कृपेने योग, न्याय, ज्योतिष, धर्म, वास्तुशास्त्र, राज्य-व्यवहार शास्त्र यासारख्या बर्‍याच शास्त्रात पारंगत होता.

त्यांनी लिहिलेले ग्रंथ आजही नावाजले जातात. परमार वंशातील महान राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजा भोजचा धारमध्ये 1000 इ.स. पासून 1055 कार्यकाल होता. राजा भोज विद्वानांचे आश्रयदाता होते. त्यांनी धारमध्ये एक विद्यापीठाची स्थापना केली होती, तेच नंतर भोजशाळा या नावाने प्रसिद्ध झाले. त्या काळातील साहित्यात या नगराचा उल्लेख धार तसेच शासन यशोगानचा असा आहे.

भोजशाळा एका खुल्या मैदानात बांधल
webdunia
WDWD
आहे. भोजशाळेच्या समोर एक मुख्य मंडळ आणि मागच्या बाजूला एक मोठे प्रार्थना घर आहे. नक्षीदार स्तंभ तसेच प्रार्थनागृहाचे नक्षीदार छत भोजशाळेच वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी दोन मोठे शिलालेख (काळ्या रंगाचे दगड) आहेत. या शिलालेखांवर संस्कृतात नाटक कोरलेले आहे. हे अर्जुन वर्माच्या काळात कोरलेले आहे.

या काव्यबध्द नाटकाची रचना राजगुरू मदन यांनी केली होती. ते विख्यात जैन विद्वान आशाधर यांचे शिष्य होते. या नाटकाचा नायक पूरंमंजरी आहे. हे नाटक धारच्या वसंतोत्सवात अभिनित करण्यासाठी लिहिले गेले आहे. भोजशाळेत स्तंभांवर धातूपासून बनविली जाणारी वर्णमाला अंकित आहे. भवन कलेच्या रूपात भोजशाळा एक महत्त्वाची कलाकृती गणली जाते.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....

webdunia
WDWD
वागिश्वरी लंडनमध्य
या ठिकाणी एके काळी सरस्वती देवीचे मंदिर असल्याचा उल्लेख कवी मदनने आपल्या नाटकात केला आहे. येथील मूर्ती भव्य आणि विशाल होती. देवीची मूर्ती इंग्रज आपल्यासोबत घेऊन गेले. आजही ती मूर्ती लंडनच्या संग्रहालयात आहे. या मूर्तीची राजा भोजद्वारे आराधना केली जात होती. वर्षातून एकदाच वसंत पंचमीला सरस्वती देवीचे तैलचित्र नेऊन तिची आराधना केली जाते. हा उत्सव वसंत पंचमीलाच साजरा केला जातो.

भोजशाळा ही ऐतिहासिक इमारत असल्यामुळे केंद्रीय पुरातन विभागाकडे सोपविण्यात आली आहे. या इमारतीसाठी केंद्र सरकारच्या मंत्रालयाने विशेष आदेश दिले आहेत. त्या अंतर्गत वर्षातून एकदा येथे वसंत पंचमीला हिंदू समाजाला पुजा-पाठ करण्याची संमती दिली आहे.

प्रत्येक मंगळवारी हिंदू समाजाचे लोक अक्षता आणि फुले घेऊन सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रार्थना करू शकतात. त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी येथे मुस्लिम समाजासाठी नमाज अदा करण्याची संमती दिली आहे. या दिवशी प्रवेश नि:शुल्क असतो. मात्र इतर दिवशी येथे प्रति व्यक्ती 1 रुपया शुल्काच्या देऊन प्रवेश दिला जातो. मुलांना शुल्काशिवाय प्रवेश मिळतो.

कसे पोहचाल?
इंदूरहून धारला जाण्यासाठी प्रत्येक पंधरा मिनिटात बस उपलब्ध आहेत. इंदूर पासून धार शहर 60 किमी अंतरावर आहे. इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय राजमार्गावर असेलेले धार, रतलाम रेल्वे जंक्शनपासून 92 किलोमीटर अंतरावर आहे. धारच्या बस स्थानकापासून भोजशाळेत ऑटो रिक्शाने सहज पोहचता येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi