Publish Date: Thu, 29 Sep 2016 (17:35 IST)
Updated Date: Thu, 29 Sep 2016 (17:38 IST)
भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर केलेल्या लष्करी कारवाईचने परिनाम शेअर बाजारात उमटले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स लष्करी कारवाईच्या वृत्तानंतर 400 अंकांनी पडला आहे.
युद्ध आणि इतर लष्करी कारवाईचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येणार आहे. त्यामुळे आज बाजारामध्ये निराशेचे वातावरण पसरले आणि विक्रीचा धडाका लागला. यामुळे 12.45 च्या सुमारास सेन्सेक्स 452 अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक 155 अंकांनी कोसळला आहे. मात्र मोदी सरकारचे मोठया प्रमाणत कौतुक आहेत.