Publish Date: Fri, 10 Aug 2018 (17:04 IST)
Updated Date: Fri, 10 Aug 2018 (17:06 IST)
नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेवहा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर गाढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती.
तात्पर्य : युक्तीने सर्व प्रकारच्या अडचनीतून पार पडता येते.