मनाचे जंगल तर खूप गहन असते
जितके आत डोकवा
तितकेच खोल असते.
वणवा फक्त रानावनातच नसतो
तो तर मनात पण असतो
धगधगत असतो.
इच्छेचा पालापाचोळा, आशाकाष्ठाची
आहुती घेऊन जळतच असतो,
तो कशाने विझेल हे माहीत नसते.
कोणती जलधारा त्याला शांत करेल
हे कळत नसते.
आणि जेव्हा कळते तेव्हा,
काळाने वणवा विझलेला असतो,
आपली स्मृती चिन्हे मागे ठेवून,
हेच तर जीवन असते.
जे आपल्याला कळत नाही आणि
ज्यावेळी कळते तेव्हा
त्याची गरज नसते.
वेळ तर निघून गेलेली असते
हातात काहीच नसते.....
साभार - इंदुर लेखिका संघ, इंदुर.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा