Publish Date: Sun, 23 Feb 2020 (13:01 IST)
Updated Date: Sun, 23 Feb 2020 (14:30 IST)
स्वप्ने आपल्या वर्तमान आणि भविष्यातील घटनांशी संबंधित असू शकतात. जर सतत भितीदायक स्वप्ने येत असतील तर वास्तूमध्ये काही सोपे उपाय आहेत जे अवलंब केल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू शकतो आणि भयानक स्वप्नांपासूनही मुक्त होऊ शकता. चला या उपायांबद्दल जाणून घेऊया.
जर तुम्ही एखादा भितीदायक स्वप्न पाहिला असेल आणि त्याच वेळेस तुमचे डोळे उघडले असतील तर ताबडतोब महादेवाचे नाम स्मरण करावे. सकाळी शिव मंदिरात पाणी अर्पण करा.
सतत वाईट स्वप्ने येत असतील तर कोणालाही काहीही न सांगता सकाळी उठताच तुळशीच्या रोपाला संपूर्ण स्वप्न सांगा. असे केल्याने स्वप्न पाहण्याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही.
हनुमान सर्व प्रकारचे वाईट दूर करणार आहेत. घरी सुंदरकांडचा पाठ वाचा. रोज हनुमान चालीसाचे पठण करावे. जर मुलांना भयानक स्वप्नांचा त्रास होत असेल तर रात्री झोपायच्या आधी बेडसाइडवर चाकू ठेवा. जर चाकू नसेल तर आपण कोणत्याही तीक्ष्ण वस्तू ठेवू शकता.
तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आणि ते पलंगाखाली ठेवा. सकाळी उठल्यानंतर भांड्यातील पाणी कुंड्यांमध्ये घाला.
जर पलंगाच्या बाजूला जोडे किंवा चप्पल ठेवल्या गेल्या असतील तर आपण भयानक स्वप्ने पाहू शकता. पलंग नेहमीच स्वच्छ ठेवा. झोपेच्या आधी आपले पाय धुण्यास विसरू नका. डार्क रंगाचे पांघरून घेऊ नका.
रात्री उष्ट्या तोंडाने झोपल्याने देखील भयभीत स्वप्ने येतात. जर स्वप्नात नदी, धबधबा किंवा पाणी वारंवार दिसले तर ते पितृ दोषामुळे होऊ शकते. घरी नियमितपणे गंगांचे पाणी छिंपडावे. मुलांच्या पलंगावर झोपण्यापूर्वी गंगाजल शिंपडा.