लागणारे जिन्नस:
दीड वाटी तांदूळ, 50 ग्रॅम बीन्स, 100 ग्रॅम मटार, 50 ग्रॅम गाजर, दोन बटाटे, तीन कांदे, 50 ग्रॅम पनीर, 50 ग्रॅम फूलकोबी, दोन टमाट्याचे स्लाइस, कोथिंबीर, मीठ, तेजपान, एक चमचा मिरे, दोन तुकडे दालचिनी, दोन मोठी वेलची, सहा-सात लवंग, एक चुटकी मोहरी, दोन मोठे चमचे शुद्ध तूप, एक चमचा गरम मसाला.
करावयाची कृती:
पनीर, बटाटे आणि कांद्याचे लांबसर कापलेले काप फ्राय करा. फूलकोबी, बीन्स फ्राय करा आणि गाजर, मटार उकळवा. तांदूळ शिजवून घ्या. कढईत तेल गरम करून तेजपान, मिरे, आणि इतर मसाले भाजून त्यात भाज्या टाका. पाच मिनिटानंतर शिजवलेले तांदूळ, मीठ, गरम मसाला टाकून तीन-चार मिनिटे कमी आचेवर ठेवून गॅस बंद करा. ट्रेमध्ये नवरत्न पुलाव काढून कांदा, टमाट्याचे स्लाइस आणि पनीरचे तुकडे टाकून कोथिंबीर टाकून गार्निश करा. गरमागरम नवरत्न पुलाव सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा