Publish Date: Mon, 03 May 2010 (14:20 IST)
Updated Date: Thu, 27 Nov 2008 (15:53 IST)
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्राश्वभूमिवर गुरूवारी झालेल्या भाजपाच्या झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सरकारला वठणीवर आणण्याचा व बिकट परिस्थितीत सरकारला मदतीचा हात देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सांगितले की, मुंबईत झालेला हल्ला हा राष्ट्रावर आलेले संकट आहे. देशातील शांतला व एकतेला हे आव्हान असल्याने अशा परिस्थितीत सरकारला मदत करणे हाच एक पर्याय आहे.
राजनाथ सिंह यांनी सकाळी जयपूर येथून पंतप्रधान पदाचे दावेदार लालकृष्ण अडवानी यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेनंतर संकट कालीन परिस्थितीत सरकारला पूर्णपणे मदत करणार आहे.