Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाणीसाठा कमी असल्याने मुंबईला जलसंकटाची चाहूल लागली

पाणीसाठा कमी असल्याने मुंबईला जलसंकटाची चाहूल लागली
, गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024 (09:01 IST)
मुंबईची तहान भागवणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० दिवसांचा पाणीसाठा कमी असल्याने मुंबईला जलसंकटाची चाहूल लागली आहे. एप्रिल-मे महिन्यात पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने आणि  धरणातील सध्याची पाणीपातळी पाहता मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट अटळ असण्याची चिन्हे आहेत.
 
राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाकडे पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त पुरवठा करण्यासाठी विनंती करणार आहोत. मात्र, ती मान्य न झाल्यास आम्हाला काही काळासाठी पाणीकपात करावी लागल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
बदलत्या हवामानामुळे पाऊसही लहरी झाला आहे. त्यामुळे ७ जूनपासून बरसणारा पाऊस आता लांबणीवर पडत आहे. गेल्या वर्षी पावसाने धरण क्षेत्राकडे पाठ फिरवल्याने १ जुलै २०२३ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली होती. परंतु, धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसल्याने ८ ऑगस्टपासून पाणीकपात रद्द करण्यात आली होती.
 
२०२२ मध्येही १० टक्के पाणीकपात केली होती. मार्च, एप्रिल व मे महिना उन्हाळी असून, पाण्याच्या पातळीत घट होण्याची चिन्हे आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील प्रत्येक शाळेत “हॅप्पी सॅटर्डे” ही संकल्पना राबविण्यात येणार