Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाणे तालुक्यातील 'त्या' १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

Navi Mumbai Municipal Corporation
, मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (15:25 IST)
ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी नगरविकास विभागामार्फत त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
 
ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सायकल चालवणाऱ्या मुलावर कुत्र्याने केला हल्ला, केरळ सरकार कुत्र्यांना मारण्यासाठी SC ची परवानगी घेणार