Publish Date: Mon, 22 Mar 2021 (21:20 IST)
Updated Date: Mon, 22 Mar 2021 (21:25 IST)
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात कोरोनाव्हायरस बाधितांची 2,195 प्रकरणे नोंदवली गेली आहे. तसेच या घटनेत वाढ झाल्यावर कोरोनाबाधितांची संक्रमित लोकांच्या संख्येत वाढ झाली असून 2,88,444 झाली आहे.
एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले आहे की संसर्गाचे हे नवीन प्रकरण रविवारी सामोरी आले. ते म्हणाले की कोरोना विषाणूमुळे आणखी पाच लोक मृत्युमुखी झाल्यामुळे मृतांची संख्या वाढून 6,382 झाली आहे. ठाण्यात संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की जिल्ह्यात आतापर्यंत 2,66,557 लोक बरे झाले आहे आणि कोरोनाच्या बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण 92.41 टक्के आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की शेजारच्या पालघर जिल्ह्यात कोविड -19 ची आतापर्यंत 47,546 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि व्हायरसमुळे एकूण 1,209 लोक मृत्युमुखी झाले आहेत.