Publish Date: Sat, 17 Jul 2021 (22:56 IST)
Updated Date: Sat, 17 Jul 2021 (22:57 IST)
मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून; खबरदारीचा उपाय म्हणून एन डी आर एफ च्या तीन पथकांना आज पुण्याहून मुंबईत दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि इतर शेजारील प्रदेशात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीचे रस्ते, बसगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आणि त्यामुळे रेल्वेच्या लोकल गाड्यांनादेखील त्यामुळे विलंब होत आहे. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.