Publish Date: Thu, 08 May 2025 (09:17 IST)
Updated Date: Thu, 08 May 2025 (09:27 IST)
Mumbai News: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील महायुती सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ४ आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचे आणि ४ महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे निवडणूक लढवण्यास इच्छुकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील महायुती सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ४ आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचे आणि ४ महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे निवडणूक लढवण्यास इच्छुकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. परंतु अद्यापपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला न्यायालयाकडून कोणताही लेखी आदेश मिळालेला नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या लेखी आदेशाची वाट पाहत आहोत.
Edited By- Dhanashri Naik