Publish Date: Thu, 26 Sep 2024 (08:53 IST)
Updated Date: Thu, 26 Sep 2024 (08:56 IST)
महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच हवामान विभागाने आज मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट घोषित केला आहे, तसेच ठाणे आणि नाशिकमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.
पावसामुळे मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा, महाविद्यालये आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. गरज असेल तेव्हाच लोकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
मुंबई मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली असून लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक भागांतून रस्त्यावर आणि घरांमध्ये पाणी साचल्याच्या बातम्या येत आहेत. लोकांना घरातून जीवनावश्यक वस्तू काढून सुरक्षित स्थळी नेण्यास भाग पाडले आहे. कुर्ला पूर्व ते गोरेगावपर्यंत अनेक भागात पाणी साचण्याची स्थिती गंभीर झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हवामान विभागाने आज मुंबईत मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' घोषित केला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बुधवारी पाणी साचल्याने काही काळ लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता. मुंबई पोलिसांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले असून केवळ अत्यावश्यक कामांसाठी बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.